अहमदनगर जिल्ह्यात घरपोच धान्य योजना सुरु झाल्यानंतर आदिवासी व दुर्गम अशा अकोले तालुक्यातून आदिवासींनी या योजनेचे अतिशय उत्सफूर्त स्वागत केले आहे.
या योजनेमध्ये आतापर्यंत ७८ गावांनी सहभाग नोंदवला असून या आदिवासी तालुक्यातील ७०% भाग घरपोच धान्य योजनेखाली पूर्ण झाला आहे. एकूण १०,००० कुटुंबांनी १०,००० क्विंटल धान्य घेतले अशी माहिती प्रांताधिकारी संगमनेर श्री जितेंद्र काकुस्ते यांनी दिली.
यावरुनच गरिबांसाठीच्या या योजनेचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणता येईल...
No comments:
Post a Comment