Tuesday, May 14, 2013

नाशिक वसंत व्याख्यानमालेत गुंफलेले १२ वे पुष्प...प्रॉपट्री आणि माणूस


दै. लोकमत (१२.०५.२०१३)

दिनांक १ मे २०१३ पासून नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या ८८व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचा शुभारंभ झाला. या व्याख्यानमालेत प्रॉपट्री आणि माणूस या विषयावर श्री शेखर गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते :

संघर्षातून झाला माणसाचा विकास - शेखर गायकवाड

प्राचीन काळापासून जमिनीच्या वादातून अनेक संघर्ष झाल्याचे दिसून येत असून, लाखो वर्षांनंतरही त्यात फरक पडलेला नाही, आधी त्यासाठी युद्ध झाले तर आता न्यायालयीन युद्ध लढले जात असल्याचे उद्गार मुख्यमंत्री कार्यालयाचे संयुक्त सचिव शेखर गायकवाड यांनी केले. नाशिक वसंत व्याख्यानमालेत आप्पासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृतिनिमित्त १२ वे पुष्प गुंफतांना ते ‘प्रॉपर्टी आणि माणूस’ या विषयावर ते बोलत होते. 

ते म्हणाले लाखो वर्षांच्या इतिहासानंतरही सगळी लढाई जमिनीसाठीच सुरू आहे. पूर्वी डोंगरावर वस्ती करून राहणार्‍या मानवाला अन्न कमी पडू लागल्याने तो शेतीकडे वळला. डोंगरावर शेती करताना नदीशेजारी केल्यास ती फायदेशीर ठरते हे कळल्यानंतर तो नदीकिनारी स्थिरावला. त्यामुळे सर्व संस्कृती नदीकिनारी विकसित झाली. त्यानंतर टोळ्याने राहणार्‍या माणसांचे जमिनीसाठीच युद्ध सुरू झाले. त्या टोळीचा प्रमुख नंतर राजामध्ये परावर्तित झाला. या राजांमध्ये मग शस्त्रांची युद्धे झाली, तीही जमिनीच्या भागांसाठीच. महाभारत हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. आधुनिक युगात जमिनींसाठी भांडणे सुरू आहेत. कायदे बदलले तरी माणसे मात्र तशीच आहेत. लाखो वर्षांमध्ये त्यात काहीही फरक पडलेला नाही हे सांगण्यासाठी गायकवाड यांनी शेतीसाठी सुरू असलेल्या वादांचा आणि त्यासाठी लावलेल्या वकिलांचे अनेक किस्से सांगून श्रोत्यांना हास्यात डुंबविले.

Monday, May 13, 2013

थेट घरपोच भाजीपाला उपक्रम...

फार्म फीस्ट (ग्रीनफिल्ड अँग्रो सर्व्हिसेस) या संस्थेतर्फे थेट घरपोच भाजीपाला देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभाप्रसंगी श्री शेखर गायकवाड...

दै. दिव्यमराठी (१२.०५.२०१३)
ग्राहकांनी मानसिकता बदलावी 

ग्राहक सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना भाव करीत नाहीत, मात्र भाजीपाल्यासाठी घासाघीस केली जाते. आता शहरातील ग्राहकांना स्वच्छ व ताजा भाजीपाला घरपोच मिळत असल्याने मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव शेखर गायकवाड यांनी केले.


फार्म फीस्ट (ग्रीनफिल्ड अँग्रो सर्व्हिसेस) या संस्थेतर्फे थेट घरपोच भाजीपाला देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. त्यावेळी गायकवाड म्हणाले की, शेतकर्‍यांनीदेखील ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना हवा तसा भाजीपाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. युरोपात शेतकरी भाजीपाला मार्केटिंग करतात. मात्र, आपल्याकडे त्याची कमतरता असल्याने शेतकर्‍यांना अजूनही भाजीपाला विक्रीसाठी संघर्ष करावा लागतो. क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम, प्रकल्प संचालक (आत्मा) सुभाष नागरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)