Showing posts with label Published Books. Show all posts
Showing posts with label Published Books. Show all posts

Thursday, February 27, 2025

Published Book...माणूस आणि प्रॉपर्टी

गेली दोन वर्ष ॲग्रोवन मध्ये लिहिलेल्या "माणूस आणि मालमत्ता " या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह "माणूस आणि प्रॉपर्टी "या नावाने माझे ३६ वे पुस्तक म्हणून प्रसिद्ध होत आहे. 

 

 

  



 



Friday, September 15, 2023

Book Publication: इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी




इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी  या साखर उद्योग धंद्यावरील महाग्रंथाचे अनावरण आज आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते वसंतदादा साखर संशोधन संस्था मांजरी येथे झाले. 

हे पुस्तक भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्री शेखर गायकवाड साहेब आणि  श्री मंगेश तिटकारे , सहसंचालक साखर यांनी लिहिले आहे .या कार्यक्रमाला मा सहकार मंत्री महोदय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब , मा विजयदादा मोहितेपाटील साहेब , मा. श्री बाळासाहेब थोरात साहेब , मा.श्री जयंतराव पाटील साहेब , मा श्री राजेश टोपे साहेब, मा श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि वसंतदादा साखर संशोधन संस्थेचे  सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Tuesday, June 7, 2022

Book Publication : एफ आर पी महितीपुस्तिका (2022) व साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफ आर पी वर परिणाम

 

आज साखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड व सहसंचालक श्री मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या एफ. आर. पी. महितीपुस्तिका (2022) , व साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफ आर पी वर परिणाम या दोन पुस्तकांच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी गृहमंत्री मा दिलीप वळसे पाटील व सहकारमंत्री मा बाळासाहेब पाटील व मंत्रिमंडळातील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, September 22, 2021

Book Published : साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम

इथेनॉल या नव्या क्षेत्रासंबंधी सामान्य शेतकऱ्यांना व उद्योजकांना अद्यावत माहिती देणारे हे पुस्तक माननीय शरद पवारांच्या हस्ते प्रकाशित...

 परंपरागत सी हेवी मळापासून, थेट ऊसाच्या रसापासून, मका /  तांदूळ यांसारख्या निकृष्ट अन्नधान्यापासून, साखरेच्या पाकापासून इथेनॉल निर्मिती करुन २०२५ सालापर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. अशावेळी शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीमुळे एफ आर पी वर काही परिणाम होईल का? हे सोप्या भाषेत सांगणारे नवे पुस्तक माननीय शरद पवारांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

 

 




 

Tuesday, September 15, 2020

नवीन पुस्तक प्रकाशित : महाराष्ट्राची भूजलगाथा

 

महाराष्ट्र राज्य हे भारत देशाचा मानबिंदू आहे. इतिहास, कला, कृषी, व्यापार, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो महाराष्ट्र हा कायमच अग्रेसर राहिला आहे. मात्र भौगोलिक कारणांमुळे या राज्याला पाण्याच्या बाबतीत काही मर्यादांना तोंड द्यावे लागते. स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात एक मोठा दुष्काळ ठरलेल्या 1972 दुष्काळाने शेती, पाणी, रोजगार आणि स्थलांतराचे मोठे प्रश्न निर्माण केले. महाराष्ट्राला प्राचीन काळापासून दुष्काळाला तोंड द्यावे लागले आहे. कृषी क्षेत्रावर अवलंबून लोकसंख्येत वाढ; उत्पादनवाढीच्या गरजेतून सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी, हवामान बदलामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळाचे संकट अधिकच व्यापक होत गेले.  महाराष्ट्र राज्यात ही आव्हाने ओळखून 1972 साली भूजलाचे व्यवस्थापन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यासारख्या शासकीय संस्थेची स्थापना झाली.

भूजल आणि दुष्काळ यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. किंबहुना शेती, पशुधन, ग्रामीण व शहरी लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज, भूजल आणि दुष्काळ या सर्व घटकांचा एकमेकांशी गुंतागुंतीचा संबंध येतो. प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश हा संबंध समजून घेणे आणि भूजल व्यवस्थापनातून दुष्काळ व्यवस्थापनाच्या वाटा सुकर करणे हा आहे. भूजल व्यवस्थापनासारखा गुंतागुंतीचा विषय सोप्या पद्धतीने समजावा अशीच या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शक्यतो तांत्रिक बाबी आवश्यक तितक्याच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत श्री के. पी. बक्षी (माजी सनदी अधिकारी, अध्यक्ष MWRRA), डॉ. आय. आय. शाह (निवृत्त अतिरिक्त संचालक, भूसवियं, पुणे), डॉ. मिलिंद देशपांडे (भूसवियं, पुणे), डॉ. हिमांशू कुलकर्णी, (वरिष्ठ भूजलतज्ज्ञ, ॲक्वाडॅम, पुणे), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद यांच्याशी झालेल्या चर्चा, क्षेत्रभेटी, शासकीय अहवाल यातून हे पुस्तक आकाराला येत गेले. या सर्वांचे मन:पूर्वक आभार!

 

या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात भारतातील जलसंपत्तीचा विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात वेध घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या प्रकरणात महाराष्ट्रातील भौगोलिक संरचनांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे. भूजलाशी संबंधित मुलभूत संकल्पना व महाराष्ट्रातील भूजलाच्या उपलब्धतेबाबत तिसऱ्या प्रकरणात विवेचन केलेले आहे. दुष्काळ म्हणजे काय आणि भूजलाचा त्याच्याशी संबंध काय याचा चवथ्या प्रकरणात विचार केलेला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी भूजल व्यवस्थापनाला पर्याय नाही. पाचवे प्रकरण लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाशी संबंधित आहे.  त्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांचा विचार केलेला आहे. आवश्यकतेनुसार काही उदाहरणेही दिलेली आहेत. तर शेवटचे प्रकरण हे भविष्यातील आव्हानांचा विचार करणारे असे आहे.

असे म्हणतात की तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल. चेन्नई शहरातील पाण्याची आणीबाणी, महाराष्ट्रातील लातूर शहराला रेल्वेने पाणी द्यावे लागणे या घटना भविष्यातील आव्हानांची नांदी आहेत. वेळेवर सावध होण्याचे शहाणपण आपण सर्वांनी दाखवणे ही काळाची गरज आहे. प्रश्न समजून घेतला की उत्तराच्या शक्यता निर्माण करता येतात. चला उत्तरे शोधूयात !

 

~*~


Tuesday, January 21, 2020

ऊस पुरवठादार शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांचेकरीता उपयुक्त माहितीपुस्तिका : एफ. आर. पी.


============================================

ऊसाच्या दरासंबंधी नेहमी वापरला जाणारा शब्द म्हणजे एफ. आर. पी.          

            ...................या एफ. आर. पी. चा अर्थ काय? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.

============================================

साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस पुरविणारे उत्पादक शेतकरी, पुरवठादार यांना त्यांनी पुरवठा केलेल्या ऊसापोटी साखर कारखान्यांनी द्यावयाची कायदेशीर किमान किंमत म्हणजेच Fair and Remunerative Price / एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर).

महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सर्वांगिण ग्रामीण प्रगतीमध्ये साखर कारखानदारी व ऊस पुरवठादार यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. सर्वसाधारणपणे राज्यात दरवर्षी रुपये २१ ते २४ हजार कोटी इतकी एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) महाराष्ट्रातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना कारखान्याकडून दिली जाते. या उदयोगातील शेतकऱ्यांची संख्या साधाणत: ३० लाख असून सभासद संख्या २० लाख इतकी आहे. एफ. आर. पी. ची रक्कम कारखान्याने वेळेवरती देण्यासाठी साखर आयुक्तालयास समन्वय, कायदेशीर उपाय व सनियंत्रण करावे लागते. राज्यातील ऊस पुरवठादारांना त्यांच्या तक्रारींची दाद कोठे व कशी मागावी याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.


याकरीता ऊस पुरवठादार शेतकरी, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांना उपयुक्त अशी एफ. आर. पी. माहितीपुस्तिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये एफ. आर. पी. म्हणजे काय, त्यातील कायदेशीर तरतूदी, महसूली विभागणी सुत्रानुसार दर (RSF) म्हणजे काय? यासंदर्भात शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्यासारख्या बाबी तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे पत्ते व संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.




Friday, November 22, 2019

News Published : 22 नोव्हेंबरपासून राज्यात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम

साखर संघाची बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी प्रश्नांवर चर्चा




हिंगोली : राज्यात ता. २२ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगामाला सुरवात होणार असून या संदर्भातील निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज्य साखर संघाच्या बैठकीत मंगळवारी (ता.१९) घेण्यात आला आहे. याबैठकीत राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली आहे. 

राज्यात सहकारी तत्वावर चालणारे १०२ साखर कारखाने असून ९३ खासगी साखर कारखाने आहेत. यावर्षी १६३ कारखान्यांनी ऊस गाळपाची परवानगी मागितली आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळणेच कठीण आहे. मागील वर्षी या कारखान्यांना गाळपासाठी एक हजार लाख टन ऊस मिळाला होता. मात्र या वर्षी केवळ साडेपाचशे लाख टन उस गाळपासाठी मिळणार आहेत. त्यामुळे सुमारे दीडशे कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, कारखान्यांच्या ऊस गाळपासंदर्भातील निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेतले जातात. मात्र यावेळी मंत्री समिती नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्य साखर संघाने पत्र दिले होते. त्यानुसार मंगळवारी राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक संजय खताळ, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, अजित देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. 

याबैठकीत राज्यातील गळीत हंगाम ता. २२ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी श्री. दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या अडचणीचे मुद्दे मांडले. मागील वर्षी केंद्राच्या धोरणानुसार साखर निर्यातीचे तेराशे कोटी रुपये अद्यापही येणे बाकी आहे. तसेच राज्य शासनाकडून कारखान्याच्या सॉफ्ट लोनचे तीन वर्षांचे थकीत असलेले सुमारे नऊशे कोटी रुपयांचे व्याज मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी या संदर्भातील प्रश्न नवीन सरकारच हाताळेल, असे सांगितले. 

८० ते शंभर दिवस चालणार गाळप 

राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळणे कठीण आहे. त्याचा परिणाम गळीत हंगामावर होणार असून यावर्षी केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणे शक्य होणार आहे. जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य साखर संघ

Tuesday, January 3, 2017

नवीन पुस्तक प्रकाशित : The Basics of Land Laws in Maharashtra

मरेपर्यंत आपण दरवर्षी एक पुस्तक लिहिन्याचा प्रयत्न करावा असा विचार पहिले पुस्तक लिहिल्यावर आला. परंतु हे जमेल का असाही विचार लगेचच घोळु लागला. आता 15 वे पुस्तक वर्ष संपन्यापूर्वी हातात देताना हे सर्वाना सांगण्याचा मोह झाला !!


Wednesday, September 28, 2016

शेतकऱ्यांनो सावधान... दोन दशकपूर्ती




माझं शेतकऱ्यांनो सावधान हे पुस्तक १९९६ साली डॉ बुधाजीराव मुळीक सर यांनी प्रसिध्द केले . त्यास आता २० वर्षे पूर्ण झाली. त्या पुस्तकामुळे मला लिहिण्याची सवय तर लागलीच पण एक शेतकरी जेव्हा साताऱ्याहून दुसऱ्यांदा हे पुस्तक घेण्यासाठी आला त्याने मला त्याचे महत्त्व लक्षात आणून दिले. तो बस मध्ये पुस्तक वाचत बसला असताना शेजारच्या माणसाने त्याच्या कडून हे पुस्तक वाचायला म्हणुन घेतले आणि दुप्पट किंमतीला त्याने ते पुस्तक त्याच्या कडून खरेदी घेतो ,तुम्हाला काय ते परत मिळेल असे सांगितले !!आज त्या पहिल्या पुस्तकाची नवी कोरी ४ थी आवृती प्रसिद्ध झाली .मीं ती माझे सासरे तात्यारामबापू आणि सासु कै .रुक्मिणीबाई यांना अर्पण केले आहे.

माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. मुलाखतीचे पैलू (२०२३)

२९. प्रशासकीय योगायोग (२०२४)

३०. महसुली शब्दकोश (२०२४)

३१. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)

३२. रंगमहसूली (२०२४)

३३. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)

३४. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)

३५. सरकारी ऋतुचक्र (२०२४)

३६. Land Laws (२०२५)

३७. Law Graduates (२०२५)

३८. माणूस आणि प्रॉपर्टी (२०२५)

३९. यशदाची यशोगाथा (२०२५)